About Vilas Rupawate

विलासभाऊ रुपवते माहिती

* नाव - विलास हरीभाऊ रूपवते 

* जन्म १६ मार्च १९६७ परेल वाडिया हॉस्पिटल 

* जन्म स्थळ नायगाव भोईविडा जुनी बिल्डिंग ७ नंबर दादर मुंबई

* जिल्हा नाशिक, तालुका सिन्नर, गाव डूबेर 

* राहता पत्ता - ७३/६७७ संविधान निवास माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर मुंबई नंबर 75 

* वडील नाव- हरीभाऊ यशवंत रूपवते

* आई नाव - मैनाबाई हरिभाऊ रूपवते 

भाऊ बहिण नाव - सिंधूताई, मिलिंद,संजय,अरूण

* पत्नी नाव - सौ.संगिता विलास रुपवते

* दोन मुले विवाहित - प्रतिश,अतिश

* दोन सुन -सौ. दिप्ती प्रतिश रूपवते , 

* सौ.स्वराली अतिश रूपवते 

* छंद सर्व खेळ , समाजसेवा 

* निर्वेशनी 

* ब्लड ग्रुप ओपॉझिटिव्ह

* व्यवसाय बिजनेस 

* १९९५ पासुन दुर्बल घटकांसाठी काम करतात 

* २०१४ रोजी महाराष्ट्र शासन दिवंगत लताताई सकट पुरस्कार मानधन एक लाख रूपये व मानचिन्ह 

* डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले , छत्रपती शिवाजी महाराज, शाहिर अण्णाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले, लताताई सकट विविध संस्था पुरस्कार भेटले 

* पद - संघटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

* अध्यक्ष - महाराष्ट्र निराधार देवदासी महिला संघटना

* अध्यक्ष - ऑल इंडिया ब्लू टाइगर 

* अध्यक्ष - दुर्बल घटक आघाडी

* माजी चिटणीस - ( महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी )

* माजी सरचिटणीस ( मुंबई काँग्रेस कमिटी )

* माजी अध्यक्ष - निराधार निराश्री व्यक्ति विकास विभाग

* माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर विलास रुपवते कार्यालयात रोज शेकडो ज्येष्ठ नागरिक निराधार गरीब व्यक्तींना रोज अन्नदान वाटत केल्या जात आहे व एका ट्रस्टीच्या माध्यमातून स्वस्तधरा दवाखाना चालू केला आहे याचा फायदा गोरगरीब जनतेला होतो 

* २५ नोव्हेंबर २००८ रोजी ३००० हजार देवदासी,विधवा, निराधार, परीत्कता, घरकाम करणारी महिला , किन्नर, यांच्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी एक किलो तेल, एक किलो साखर, एक किलो मैदा, एक किलो रवा, व इतर साहित्य अर्धा किलो वाटप करून दुर्बल घटकांच्या घरी दिवाळी साजरी केली ,

* १९८२ रोजी १४ वर्षाचे असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाव मिळाले पाहिजे लॉंग मार्चमध्ये आंदोलन मध्ये १ दिवस आझाद मैदान किल्ला कोट लॉकप मध्ये माझ्या बरोबर प्राध्यापक श्री,जोगेंद्र कवाडे साहेब , पत्रकार दिवाकर शेजवळ, पत्रकार आनंद शिंदेकर होते 

* १८,२४ वय पर्यंत भारतीय दलित पॅंथर आठवले साहेब बरोबर काम केले  

* विलास रूपवते सर्व धर्मीय नागरिकांसाठी काम करतात त्यांनी, बुद्ध विहार, हिंदू मंदिर,मस्जिद, गुरूदौर, चर्च धर्म थळाला आर्थिक मदत केली त्याच बरोबर सर्व महापुरुषांच्या जयंतीला व तसेच गणंपती बाप्पा, दहीहंडी मंडळाना आर्थिक मदत केली

* तसेच कॅन्सर , किडणी, हृदया आजार, अपघात पेशंटला आर्थिक मदत केली 

* हजारो गुन्हेगार त्यांना चांगले मार्गदर्शन देऊन चागली व्यक्ती बनून समाजात स्थान दिले 

* तरूण युवकांना व्यवसाय ,रोजगार व नोकरी मिळून दिली, 

* विलास रुपवते यांनी रक्तदान शिबीर, मेडिकल कॅम्प, एच आय व्ही शिबिर, चष्मा शिबिर, राजवाडी रुग्णालय दोन चाकी खुर्ची, टॉली भेट दिली

*अंध ,अपंग ,देवदासी,विधवा महिलांना रोजगार साठी आर्थिक मदत केली 

* कारगिल लढाई मध्ये भारतीय सैनिक शहीद झाले त्यांच्या परिवाराला हजारो रुपये मदत मुख्यमंत्री नारायण राणे निधीमध्ये दिली,

* विलास रूपवते यांनी ब्लड बँक रक्त विकनारा घोटाळा पकडून दिला आणि हजारो नागरिकांचा जीव वाचवला 

* विलास रुपये यांनी विविध नागरिकांच्या सुविधासाठी साहा दिवस अमर उपोषण केले,

 * २०१०रोजी रोजी आझाद मैदान पोलीस कस्टडी लॉकाप मध्ये दुर्बल घटकांसाठी ४ दिवस उपोषण केले, 

* विलास रूपवते यांनी नशा मुक्ती अभियान राबविले त्या बद्दल मोर्चे काढले,

* विधवा, परीत्कता ,निराधार ,(देवदासी , आराधी,जोगती, वाघ्या मुरळी, पोतराज,) घरकाम करणाऱ्या महिला , सेक्स वर्कर महिला, तुतीयपंती, अंध अपंग, बोना, मंदमती, फाशी पारधी समाज आदिवासी , नाका कामगार आशा वरील दुर्बल,सोशित, वंचित, पिडित, या दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी व मागणीकडे शासनाचे लक्ष वैधण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र जिल्हा, तालुका या ठिकाणी शेंकडों मोर्चे निदर्शन केले तरी सुद्धा शासनाचे लक्ष नाही गेल्यामुळे २०१० रोजी संघटनेच्या महिलांनी १५ ऑगस्ट दिनी अजून भारत देश स्वातंत्र्य झाला नाही म्हणून इन्कलाब जिंदाबाद घोषणा देऊन स्वतःचे महिलांनी कपडे काढून अर्ध लग्न ऐतिहासिक आंदोलन करून सरकारचा निषेध केला या आंदोलनाची पडसाद आंतरराष्ट्रीय विषय झाला इंटरनॅशनल बी.बी.सी न्युज व न्युज यांनी दखल घेतली तसेच शेकडो मंत्रालया समोर ऐतिहासिक उग्र आंदोलन केले, या मध्ये विलास रुपवते व हजारो महिलांवर शेकडो गुन्हे दाखल झाले आणि रूपवते व महिलांना जेल मध्ये जावा लागले पोलिसांचा मार सुद्धा खावा लागला 

* २२ जून २०१० रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन दिवस साजरा केला ३० ठिकाणी रेल रोको, १८ ठिकाणी रास्ता रोको, ४० बस फोडल्या, १२ तहसील तोडले कार्यालय ८ तहसीलदारांना काळे लावले, विधानसभा अधिवेशनात महिला घुसल्या , या आंदोलनात २००० हजार वरून महिलांनावर गुन्हे दाखल झाले तसेच विलास रुपवते यांच्या वर सुद्धा आंदोलनाचे खुप गुन्हे दाखल झाले 

*२००९ रोजी मुंबई दादर शिवाजी पार्क येथे विलास रुपवते यांच्या बरोबर लताताई सकट यांनी ऐतिहासिक लाखो महिलांचा मेळावा घेतला तसेच आझाद मैदानावर हजारोचा मार्चा काढले, 

* मुंबई साईन सौमया मैदानात लाखोचा मेळावा घेतला या मेळाव्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब व सर्व मंत्री उपस्थित होते 

* विलास रूपवते यांनी महाराष्ट्र शासना कडून दुर्बल घटकांसाठी काम करून घेतले 

* दिवंगत लताताई सकट यांच्या नावे महाराष्ट्र शासनाकडून पुरस्कार मंजूर करून घेतला या पुरस्कारामध्ये जी व्यक्ती देवदासी साठी काम करेल त्यांना व्यक्तिगत एक लाख रुपये पुरस्कार व सामाजिक दोन संस्थेला पन्नास हजार रूपये पुरस्कार ,

*देवदासी यांच्या मुलांसाठी लग्नासाठी पन्नास हजार रुपये मिळतात

*६० वर्षे ज्येष्ठ नागरिक घरकाम करणाऱ्या महिला साठी एकदम १०,००० रूपये मिळून दिले 

*देवदासी निराधार विधवा १०० रूपये मिळत होते आज दर महीना १५०० हजार रूपये लाखो महिलांना मिळतात 

* विधवा महिलांना हजारो पिवळे राशन कार्ड चालू करून घेतले 

* मुंबई येथे रोड वरती राहणारे फासेपारधी यांना राशन कार्ड व वोटिंग कार्ड चालू करून दिले, 

* देवदास यांच्या नावाने मुली व महिला सोडत होते ते बंद केले

* २०१२ रोजी किन्नर समाजसाठी स्वातंत्र्य महामंडळ 

*अपंगांचे उत्पन्न दीड लाख करून घेतले 

* २०१९ रोजी मुंबई ग्रँड रोड येथे पाववाला स्टेट सिप्ले बिल्डिंग मध्ये सेक्स वर्कर यांचे ७५ घरावर डी.सी.पी करंडीकर यांच्या माध्यमातून रेड करण्यात आली तेव्हा पोलिसांनी तोडफोड करून त्यांची करोडो रूपयांची लुटमार केली , या घटनेचा आवाज मंत्रालयात प्रधान सचिव भूषण गगंराणी साहेब यांच्या समोर तक्रार नेली तेव्हा त्यांनी पुणे CID आयुक्त अतुल कुलकर्णी यांच्या कडे CID चौकशी लावली 

* कोरोना काळात महिला साठी रेल्वे लोकल चालू करून घेतली 

* कोरोना काळात ६ डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी सर्व नागरिकांना अभिवादन करण्यासाठी खुले करून घेतले तेव्हा विलास रुपवते यांच्या वर गुन्हे दाखल झाले 

* कोरोना काळात शेकडो नागरीकांना राशन दिले ज्या नागरिकांकडे खर्चाला पैसे नव्हते त्यांना गुगल पेच्या माध्यमातून मदत केली

* कोरोना काळात नागरिकांची विल पावर वाढण्यासाठी आयुर्वेदिक गोळ्या घरोघरी वाटप केल्या  

* विलास रूपवते यांच्या आंदोलनाची दखल घेऊन आता सध्या महाराष्ट्र शासन महिलांसाठी प्रत्येक नविन योजना राबवत आहे, 

*विलास रूपवते यांचा आंदोलनाचा आवाज थांबण्यासाठी सरकारने सर्व त्यांचे डिपार्टमेंट वापरून खुप त्रास दिला आणि विलास रूपवते यांच्या परिवाराला सुध्दा खुप त्रास दिला तरी सुद्धा विलास रुपवते आपली लढाई चालू ठेवली

* २००९ रोजी विलास रुपवते, लताताई सकट, यांचा मोठा अपघात घडून आणला या मध्ये विलास रूपवते यांना गंभीर जखमा झाल्या हात,पाय मणक्यांची हड्डी तुटली संपूर्ण चेहरा तुटला पण गरीबाच्या आशीर्वादाने विलास रुपवते लवकरच बरे झाले आणि पुन्हा संघर्षासाठी उभे राहिले  

* विलास रूपवते यांची मागणी न पुर्ण झालेली महाराष्ट्र सरकारकडे प्रोसिजर मध्ये आहे  

*१) देवदासी,विधवा, विधवा परीत्कता स्वतंत्र महामंडळ

*२) 1994 साली शासनाच्या माध्यमातून देवदासी यांचा सर्वेक्षण केले त्यामध्ये चुकून राहिलेल्या देवदासी यांचा त्या धर्तीवर पुन्हा एकदा सर्वेक्षण करावा 

* ३)विधवा महिलांना कायमस्वरूपी ५००० रूपये द्यावे

*४ निराधार योजनेमध्ये जाचकअटी रद्द करावे 

*५) किन्नर समाजासाठी शासनाच्या माध्यमातून घर मिळावे 

*६)घरकाम करणाऱ्या महिलांना ज्येष्ठ नागरिक झाल्यावर त्यांना हि दर महिना ५००० रूपये मिळावे 

*७)सेक्स वर्कर महिलांना कायदेशीर परवानगी मिळावे , तसेच ज्येष्ठ नागरिक झाल्यावर दर महिना ५००० रूपये मिळावे 

* आंतरराष्ट्रीय गुगल सारख्या कंपनी विरोधात आंदोलन करून २०१५ रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 14 एप्रिल जयंतीला गुगल डूडरवर फोटो लावला

* मराठी इयत्ता सहावीची पुस्तिका मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जन्म तारीख 4 एप्रिल केली होती त्या मराठी पुस्तिका संघटनेच्या विरोधात आंदोलन करून संचालक मंडळाने माफी मागीतली व लाखो पुस्तिका जाळून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मतारीख १४: एप्रिल करून घेतली 

* शाहिर सचिन माळी यांच्या सुटका साठी आझाद मैदानावर उपोषण करून सुटका करून घेतली 

* घाटकोपर माता रमाबाई आंबेडकर नगर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचाह अर्धा पुतळा खासदार गुरुदास कामत यांच्या विरोधात आंदोलन करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा १३ फुट करून घेतला

* विलास रूपवते यांनी लोकसभा निवडणुकीत दोन तृतीयपंथी , दिवांग, विधवा, देवदासी महिलांना निवडणुकीला उभे केले होते कारण दुर्बल घटकांचा आवाज शासन व समाजापर्यंत पोहोचवली

* २०१० रोजी विलास रूपवते यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी स्वतः सेना भवनला बोलुन खासदारकीची उमेदवारी देत होते पण विलास रुपवते यांचा आपघात झाल्या मुळे संधी भेटली नाही 

* २०१४ रोजी विलास रूपवते यांना राजकीय खुप वेळा चान्स भेटला होता देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी व श्री अमित शाहा यांनी स्वतः फोन करून तसेच श्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः भेटून खासदार व मत्री ऑफर दिली 

* विलास रूपवते यांना श्री.राज ठाकरे साहेब घाटकोपर पश्चिम विधानसभा उमेदवारी देणार होते विलास रुपवते यांनी उमेदवारी नाकारली म्हणून राम कदम यांना घाटकोपर पश्चिम उमेदवारी भेटली श्री राज ठाकरे यांनी तुला सोबत यांना विचारले विलास भाऊ तुम्हाला आमदार, खासदार, मंत्री बनवतो विलास रुपवते यांनी राज ठाकरे यांना सांगितले साहेब मला कुठलेही अपेक्षा नाही तुमच्याकडून तुम्ही आपल्या भाषणामध्ये दुर्बल, शोषित ,पीडित, वंचित यांचा विषय घ्यावा हिच विनंती तेव्हा राज ठाकरे विलास रुपवते यांना बोलले माझ्यासमोर पहिला एक नेता आहे तो जनतेसाठी मागतो स्वतःसाठी काही मागत नाही आणि त्यांनी विलास रुपवते यांचे जवळ घेऊन कौतुक केले

* विलास रूपवते यांनी काँग्रेसवर विश्वास ठेवला त्यांनी विलास रुपवते यांना धोका दिला 2009, 2010 रोजी काँग्रेसचे सरकार होते तेव्हा विलास रुपवते यांनी सरकारला आंदोलांनी सोळकपोळ केले होते तेव्हा काँग्रेस पक्षाने विलास रुपवते यांना बोलून सांगितले तुम्ही मागणारे बनू नका तुम्ही देनारे बना तुम्हाला आम्ही गोरगरिबांसाठी काम करण्याची तुम्हाला संधी देऊ अशी कमेंट केली होती पण काँग्रेसने दिवंगत लताताई सकट यांची मागणी पुर्ण केली पण विलास रुपवते यांना सरकार मध्ये काम करण्याची संधी दिली 

* २०२२ रोजी सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब बरोबर गद्दारांनी पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री झाले हि गोष्ट मनाला लागली सन्माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना कोरोना काळात ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा जीव वाचवला आशा व्यक्तीला सत्तेच्या लालची पोटी भाजप व शिंदे यांनी सरकार पाडले म्हणून मी सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी काही नाही अपेक्षा ठेवता मी शिवसेना मध्ये प्रवेश केला परंतु उद्धव साहेबांनी मला मोठेपणा देऊन पक्षाचे पद न मागता शिवसेना संघटक पदी नियुक्ती केली 

आता माझे एकच लक्ष आहे सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पुन्हा एकदा बघण्यासाठी मी दिवस रात्र काम करत आहे.